मेंढपाळ गुलाब शिंदे हे भूमिहीन आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या मेंढ्यावरच होता. आता त्याच मेंढ्या मृत पावल्यामुळे त्यांच्यावर संकट ओढावले आहे. शिंदे यांच्यावर बाहेरील कर्जही आहे. आता ते कसे फेडावे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांना जगण्याचा कोणताही आधार नाही. २८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्यामुळे शिंदे यांचे जवळपास चार लाखांच्या वर नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी मेंढपाळ युवा मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष दादाराव महानर यांनी केली आहे.