

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथे एका तरुण शेतकऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.15) सकाळी 11. 45 वाजता घडली. विष्णू शिवाजी खडसे (वय 32 ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेनंतर तरुणाला तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. (Washim News)