Wardha News | वर्धा जिल्ह्यात 1 ते 5 जून कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" अभियान' 

या अभियानांतर्गत गावात सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, आणि जलस्रोतांचे शुद्धीकरण यावर भर
Wardha News | वर्धा जिल्ह्यात 1 ते 5 जून कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" अभियान' 
Published on
Updated on

Zilla Parishad Wardha

वर्धा : स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू अभियान' हा ग्रामीण भागाचा शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धन साधणारा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. या अभियानांतर्गत गावात सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, आणि जलस्रोतांचे शुद्धीकरण यावर भर दिला जाणार असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व सर्व स्तरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी केले आहे. 

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिनांक एक ते पाच जून 2026 या कालावधीमध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छ गाव सुरक्षित जलवायू हे महत्त्वाकांक्षी अभियान राबवायचे आहे.  अभियानाची वैशिष्ट्ये स्वच्छतेचे महत्त्व कचरा व्यवस्थापन - ओला व सुका कचरा वेगळा करून त्यावर योग्य प्रक्रिया केली जाते. यामुळे गावात दुर्गंधी व रोगराई पसरण्यास आळा बसतो. सांडपाणी व्यवस्थापन - सांडपाण्याचा पुनर्वापर करून शोषखड्डे तयार केले जातात, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय टळतो.

Wardha News | वर्धा जिल्ह्यात 1 ते 5 जून कालावधीत "स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू" अभियान' 
Wardha drowning death | वर्धा येथे नदीच्या पात्रात बुडून तीन जणांचा मृत्यू 

प्लास्टिक बंदी - गावात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात येते.सुरक्षित जल आणि पर्यावरण:जलसंवर्धन - विहिरी आणि बोअरवेलचे पुनर्भरण (Recharge) करून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखली जाते. वृक्षारोपण - 'हरित गाव' संकल्पनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर झाडे लावून हवामान बदलाचे धोके कमी केले जातात. ग्रामस्थांचा सहभाग जागरूकता अभियान  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नागरिकांना पाणी आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते.

आरोग्य रक्षण - स्वच्छतेमुळे गावातील बालमृत्यू आणि साथीच्या आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.हे अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करून आपल्या गावाला 'स्वच्छ आणि हरित' बनवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news