ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध अभियान तसेच उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वच्छता ही सेवा हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात दृश्यमान स्वच्छता व सफाईमित्र कल्याण यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये स्वच्छतेवर उपक्रम राबविणे, स्वयंस्फूर्तीने श्रमदान करून ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, रेल्वे स्थानके, पर्यटनस्थळे, उद्याने, अभयारण्य, ऐतिहासिक वास्तू वारसास्थळे, नदी किनारे, नाले, घाट आदी सार्वजनिक ठिकाणी ग्रामीण व शहरी भागामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना आहेत. शहरे व गावठाण परिसरातील विशेषतः बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, पर्यटन स्थळे आदी ठिकाणच्या भिंती रंगविणे व कचराकुंड्या ठेवावयाच्या आहेत.