वर्धा : बाजार समितीच्या अडचणींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.7) बाजार समितीचा बंद पुकारण्यात आला. या बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समिती बंद होत्या. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला फटका बसला. खरीप हंगामाची आवक हळूहळू सुरू होत आहे. बाजार समितीत आवक कमी असली तरीही एक दिवसाच्या बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीला फटका बसलेला आहे.
बाजार समितींना कामकाज करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला सर्वत्र प्रतिसाद मिळाला. वर्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील या बंदमध्ये सहभागी झाल्या. वर्धा जिल्ह्यातील बाजार समिती सोमवारी सात ऑक्टोबर रोजी बंद राहिल्या. बाजार समिती बंद राहिल्यामुळे लिलाव बंद होते. बाजार समिती बंद असल्याने आवक देखील झाली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला.
बाजार समितीमध्ये हळूहळू सोयाबीनची आवक होत आहे. बाजार समिती बंदचा परिणाम बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झाली नाही. मंगळवार 8 ऑक्टोबर पासून बाजार समितीचे कामकाज नियमित सुरू राहील, असे बाजार समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मंगळवारपासून बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक सुरू होणार आहे.