Vijay Wadettiwar: गांधीवादी शास्त्रज्ञावर हजारो पोलीस सोडले.. सरकार इतके असुरक्षित झाले आहे का, वडेट्टीवार यांचा सवाल

Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarPudhari
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

Vijay Wadettiwar: सत्य, अहिंसा आणि संविधानाच्या मार्गाने लढणाऱ्या एका निःशस्त्र गांधीवादी शास्त्रज्ञावर हजारो पोलिसांचा गराडा घालण्याइतके केंद्र सरकार असुरक्षित झाले आहे का? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Wadettiwar
Monsoon Session 2026 : निकृष्ट कोळशामुळे राज्यातील वीज निर्मितीवर परिणाम; पुरवठादारांना ब्लॅकलिस्ट करा : विजय वडेट्टीवार

सलग २० दिवसांच्या उपोषणामुळे शरीर क्षीण झालेल्या सोनम वांगचुक यांच्यावर पोलिसी बळाचा वापर करताना केंद्र सरकारला लाज वाटली नाही का?सत्याग्रहाला दडपशाहीने उत्तर देणे ही लोकशाहीची नव्हे, तर हुकूमशाहीची ओळख आहे.

Vijay Wadettiwar
Monsoon Session | हत्तीच्या हल्ल्यात चार जणांचा बळी : घटना रोखण्यासाठी  विशेष टास्क फोर्स स्थापन करा

विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या, लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची हेळसांड करणाऱ्या शिक्षणमंत्र्याला वाचवण्यासाठी मोदी सरकारने आज दडपशाहीच्या सर्व मर्यादा पार केल्या. संवाद हा भारताचा आत्मा आहे, लोकशाहीचे तत्व आहे.

Vijay Wadettiwar
Nagpur News | निवडणुकीत ७० टक्के लोक विकले गेले, वडेट्टीवार यांचा आरोप

मोदी सरकारने सोनम वांगचुक यांच्यासोबत कोणताही संवाद न करता थेट त्यांना फरफटत नेले, ही अघोषित आणीबाणी आहे! अशा तीव्र शब्दात वडेट्टीवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news