Nagpur Heavy Rain | मुसळधार पावसाने स्वरूप नगर जलमय; घरात पाणी शिरले, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान

पूरग्रस्त भागाची काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे-पाटील यांची पाहणी, राज्य सरकार व मनपाच्या निष्काळजीपणावर टीका, पंचनामे व तातडीच्या मदतीची मागणी
Nagpur Waterlogging
Nagpur WaterloggingAI photo
Published on
Updated on

Nagpur Waterlogging

नागपूर : नागपुरात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने स्वरूप नगर परिसराला अक्षरशः जलमय केले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांच्या संसाराचे मोठे नुकसान झाले असून धान्य, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह जीवनावश्यक साहित्य पाण्यात भिजून निकामी झाले. पाणी ओसरल्यानंतरही चिखल, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनावर तीव्र टीका केली.

नागपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे स्वरूप नगर परिसरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. काही तासांतच साचलेल्या पाण्याने घरांमध्ये प्रवेश केल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. घरातील धान्य, फर्निचर, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले.

Nagpur Waterlogging
NCP (SP) nagpur news : नागपूर जिल्हा कार्यकारणी बरखास्त; सलील देशमुखांचा मोठा निर्णय

पाणी ओसरल्यानंतर परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले असून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसर निर्जंतुक करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे-पाटील यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. बाधित कुटुंबांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Nagpur Waterlogging
Nagpur Heavy Rainfall | नागपुरात मुसळधार पावसाने सर्पांचा शिरकाव; दोन ठिकाणी विषारी नागांचे सुरक्षित रेस्क्यू

यावेळी बोलताना गुडधे-पाटील यांनी मुसळधार पावसानंतर नागपुरात निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीस राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरातील रखडलेली विकासकामे, अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले आणि हजारो कुटुंबांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच, नुकसानग्रस्त नागरिकांच्या घरांचा तातडीने पंचनामा करून त्यांना आर्थिक मदत द्यावी, पूरग्रस्तांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शहरातील जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांना त्वरित दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

logo
Pudhari News
pudhari.news