लोकसभा जागावाटपाचा विषय अंतिम टप्प्यात : विजय वडेट्टीवार
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. चार ते पाच लोकसभा मतदारसंघातील जागेचा विषय शिल्लक आहे. पुढच्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि.१६) पत्रकारांशी बोलताना दिली.
नार्वेकर यांनी संविधानाला धरून निर्णय दिलेला नाही, अनेक विधी तज्ञाचे मत असेच आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. महायुतीत शिंदे गट व अजित पवार गट यांच्या जागा भाजपच फायनल करणार असल्याचा टोला महायुतीच्या जागावाटपावरून विजय वडेट्टीवार यांनी यावेळी लगावला.
दावोस दौरा संदर्भात छेडले असता मुख्यमंत्री दावोसला पहाड खोदायला गेले मात्र त्यातून उंदीर निघणार आहे. मागच्या वेळेस पण तसेच झाले. दावोसला घेऊन गेलेले वऱ्हाड ज्यांची गुंतवणूक नव्हती , त्यांना गुंतवणूकदार म्हणून दाखवण्यात आले, असाही आरोप विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला.
हेही वाचा :
- Rahul Gandhi On Ram Pranpratistha : प्राणप्रतिष्ठा सोहळा केवळ नरेंद्र मोदींचा राजकीय सोहळा : राहुल गांधी
- विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, माझा तुम्हाला पाठिंबा : ठाकरेंचे शिंदे गटाला आवाहन
- Mahayuti Lok Sabha : लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, भाजप ३२, शिंदे गट १० तर पवार गट ६ जागा लढणार?