…तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील | पुढारी

...तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जातो: जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्व उद्योग राज्याबाहेर नेले जात आहेत. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. ड्रग्ज माफियांना आश्रय मिळत आहे. राज्यात सध्या उडता महाराष्ट्र अशी स्थिती झाली आहे. बलात्कारांच्या गुन्ह्यात चौथा तर खूनांच्या गुन्ह्यात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. याकडे गृहखात्याचे लक्ष नाही, महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार कमी पडत आहे, यावर बोलले, तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते विधानसभेत बोलत होते.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते. शेवटच्या दिवशी केवळ तीन प्रस्ताव मांडल्यामुळे जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, सभागृह संपले नाही. एक तर दहा दिवसांचे अधिवेशन केले आणि तिकडून दोन प्रस्ताव आणि इकडून एक प्रस्ताव असे हे बरोबर नाही. त्यासाठी आम्ही म्हणत होतो की एक महिन्याचे अधिवेशन घ्या आणि चर्चा करा.

हेही वाचा 

Back to top button