चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत आंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी दोनच्या सुमारास घडली. रात्री आठ वाजता घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी जावून बालकांची शोधाशोध केली. दोन्ही मुलांचे मृतदेह आज (दि.८) सकाळी मिळाले. गौरव विलास ठाकूर (वय १४), शौर्य भास्कर पिंपळशेंडे (वय १५, दोघे रा. गोंडपिंपरी, शिवाजी चौक मृतांची नवे आहेत.