भंडारा: पुढारी वृत्तसेवा : विजेच्या धक्क्याने युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मचारणा येथे शुक्रवारी संध्याकाळी घडली. जयेश मोरेश्वर घोनमोडे (वय १७, रा. मचारणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आयटीआयचा विद्यार्थी होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयेशच्या आजीचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने सायंकाळी जेवणाच्याप्रसंगी अंगणात प्रकाश मिळावा, म्हणून विजेचा दिवा लावण्यात आला होता. छोटेखानी चार लोखंडी खांबाचा मंडप घातला होता. अनावधानाने दिव्याचा वायर खराब असल्याने खांबाला वीज प्रवाह मिळाला. यावेळी गावातीलच पिऊ मुकेश बांते (वय ५) हिला करंट लागला. हे जयेशच्या लक्षात येताच त्याने तिला वाचवण्याकरिता पुढे येऊन तिला खेचले. मात्र, जयेश लोखंडी खांबाला चिपकून राहिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जयेशच्या मागे आई व एक लहान भाऊ आहे. या घटनेची पालांदूर पोलीस स्टेशन येथे नोंद झाली आहे.
हेही वाचा