अमरावती, पुढारी वृत्तसेवा : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू आणि युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा भेटणार असल्याची चिन्हे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात दिसून येत आहे. प्रहारने लोकसभेच्या जागेवर दावा ठोकला असून आमदार राणा यांनी देखील कितीही दावे केले ते खोटे ठरतील असे प्रत्युत्तर दिले आहे.