केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे समाजातील सर्वच घटक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. मात्र, सरकार केवळ बघ्याची भूमिका घेऊन आहे. नीट सारखे परीक्षा घोटाळे होत आहे. शेतकऱ्यांना बियाणे मिळत नसून शिंदे सरकार सगळ्या आघाड्यांवर सपशेल फेल ठरले आहे, असा आरोप यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी केला. यावेळी राज्य सरकारच्या प्रतीकात्मक तयार करण्यात आलेल्या पुतळ्याला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार अभिजित वंजारी यांनी चिखल माखून केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचा निषेध केला.