दरम्यान, अमरावती लोकसभेच्या जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी सोडविणारे नक्की सोडवितील, असे स्पष्ट केले. या देशातील लोकशाही जगातील सर्वात प्रस्थापित झालेली लोकशाही आहे. अशा लोकशाहीमध्ये लोकसभेकरिता त्या- त्या पक्षाला उमेदवार ठरवायला, कोणाला कुठली जागा द्यायची, चिन्ह कुठले द्यायचे, हे ठरवायला वेळ लागतो. त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहित आहे. योग्य दिशेने गाडी चालली आहे. त्या- त्या पक्षांच्या नेत्यांना कधी मूठ उघडायची, हे चांगले माहित आहे. त्यामुळे ते मूठ उघडतील, असेही ते म्हणाले.