जी. एन. साईबाबा प्रकरणी हायकोर्टाचा निकाल शहीदांच्या कुटुंबीयांसाठी दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
नागपूर, पुढारी वृत्तसेवा : जी. एन. साईबाबा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल हा शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय दुर्दैवी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, नक्षलवाद्यांशी लढताना ज्यांना आपला जीव गमवावा लागतो किंवा या लढ्यातील जे पोलीस, जवान शहीद होतात, त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आणि निराशाजनक आहे. या निकालाविरोधात आम्ही तातडीने सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.
ज्याच्या विरोधात भक्कम पुरावे आहेत, त्याला केवळ विलंबाने खटल्याची परवानगी मिळाली, या एका तांत्रिक कारणामुळे सोडून देणे, हा त्या शहीद कुटुंबांप्रति अन्यायकारक आहे. हे आम्ही सारे सर्वोच्च न्यायालयात योग्यप्रकारे मांडू आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या निकालामुळे त्या कुटुंबीयांना काय वाटत असेल, याचा विचार मी वारंवार करतो आहे, असेही फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.
हेही वाचलंत का?
- Nora Fatehi Dance : नोरा फतेहीचा सुमुद्र किनाऱ्यावरील नमकीन डान्स पाहून तुम्ही म्हणाल ‘समंदर में नहाकर और भी…’
- NZ vs PAK : पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर किवी घायाळ; फिलिप्सच्या बॅटचे झाले दोन तुकडे (Video)
- Web Series XXX : सर्वोच्च न्यायालयाने एकता कपूरला फटकारले; म्हणाले, ‘तरुणांचे मेंदू दुषित करते’