चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात शेतमजूराचा मृत्यू

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : काटवन येथील नाल्याजवळ वाघाने शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेत मजुरावर हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. ३१) सकाळी आठच्या सुमारास घडली. रामभाऊ कारु मरापे (वय ४३) असे मृतकाचे नाव आहे.

मूल येथील हरडे यांच्या शेतात रामभाऊ मरापे हा शेतमजूर म्हणून कामाला होता. नेहमी प्रमाणे मंगळवारी (दि.३१ ) सकाळी ८ वाजता रामभाऊ शेतात जात असताना शेताला लागून असलेल्या नाल्यामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. रामभाऊ याने हल्ला परतवुन लावण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचा-यांनी तात्‍काळ घटनास्थळी धाव घेतली.

ही घटना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येत असुन सभोवताल घनदाट जंगल आहे. त्यामुळे या परीसरात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. या परिसरात अनेकदा वाघाच्या हल्याच्या घटना घडल्या आहेत. वाघाच्या हल्यात आतापर्यंत तीन व्यक्तींचा आणि १० ते १२ जनावरांचा मृत्‍यु झाला आहे.

अशा वाढत्‍या घटनांमूळे वाघाचा बंदोबत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मृत  मरापे याच्या कुंटूबियास वनविभागा तर्फे आर्थिक मदत देण्यात येणार आहे अशी माहिती वन परीक्षेत्राधिकारी यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button