

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या अन्यायकारक धोरणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे जगणे हलाखीचे झालेले आहे. महागाईने कळस गाठलेला आहे. सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत समस्यांना वाचा फोडण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमसर-मोहाडी विधान सभेच्या सहकार्याने खापा (तुमसर) येथील चौरस्त्यावर हजारो शेतक-यांसह रस्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शेतक-यावरील अन्यायकारक धोरण रद्द करावे, वाढती महागाई तसेच बेरोजगारीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. २७) राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शेतकरी बांधवानी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले.