Barvi Dam | कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा : बारवी धरणातील पाणीसाठा ५७ टक्क्यांवर

कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणाच्या पाणीपातळीत आता लक्षणीय वाढ
Barvi Dam Water Level
Barvi Dam Water Level Pudhari
Published on
Updated on

Barvi Dam Water Level

डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या बारवी धरणाच्या पाणीपातळीत आता लक्षणीय वाढ होत चालली आहे. धरण परिसर हिरवागार झाला असून वरूणराजाच्या या मेहेरबानीमुळे कल्याण-डोंबिवलीकरांसह जिल्हावासियांसाठी दिलासादायक बातमी आहे.

मंगळवारी (दि. २१) सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार बारवी धरणातील पाण्याची पातळी ६६.७० मीटरवर पोहोचली आहे. धरणाची कमाल मर्यादा ७२.६० मीटर आहे. सध्या धरणात १९४.५५ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा आहे, जो एकूण क्षमतेच्या ५७.४१ टक्के आहे.

Barvi Dam Water Level
Dombivli Pothole Issues | डोंबिवलीत खड्ड्यांचे पूजन करत रिक्षाचालकांचे अनोखे आंदोलन

गेल्या २४ तासांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार असा ५९.६० मिलिमीटर पाऊस झाला आहे. मोसमापासून आतापर्यंत एकूण १३९८.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुढील ४-५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे. त्यामुळे धरण लवकरच ६० टक्क्यांचा टप्पा पार करेल आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

गेल्या वर्षी काय होतं ?

गेल्या वर्षी २१ जुलै २०२५ रोजी धरण ७०.०२ मीटर आणि ७८.७० टक्के भरले होते. त्यावेळी पर्जन्यमान १६६३.०० मिलिमीटर होते. जरी यंदा सध्या २१ टक्क्यांनी पाणीसाठा कमी असला तरी काळजीचे कारण नाही. कारण जुलैचा शेवट आणि संपूर्ण ऑगस्ट हा बारवी भरण्याचा खरा काळ आहे. गेल्या ५ वर्षांची आकडेवारी पाहता बहुतेक वेळा ऑगस्ट अखेरपर्यंत धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरते.

Barvi Dam Water Level
Dombivli Doctor Assault Case: नगरसेवक रमेश म्हात्रे पुन्हा तुरुंगात; जामिनाला उच्च न्यायालयाची स्थगिती

प्रत्येक थेंब मोलाचा

बारवीतून कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ आणि ठाणे ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना पाणीपुरवठा होतो. सध्याची गती पाहता यंदा पाणी टंचाईचा प्रश्न उद्भवणार नाही, असे जलविभागाचे म्हणणे आहे. प्रशासनाने जिल्हावासियांना आवाहन केले आहे की, पाऊस चांगला असला तरी पाण्याचा जपून वापर करा. प्रत्येक थेंब मोलाचा आहे. वरूणराजा असाच बरसत राहिला तर यंदा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात बारवी पूर्ण क्षमतेने भरून कल्याण-डोंबिवलीकरांसह जिल्हावासियांची तहान भागविण्यास सज्ज होईल, असा प्रशासनाला विश्वास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news