कल्याण लोकसभा मतदारसंघात आगरी मतदार सर्वाधिक आहेत. मुंब्रापासून ते श्री मलंगगड परिसरात आगरी स्थानिक मतदार सर्वाधिक आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत आगरी कार्ड राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केले होते. मात्र उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचला नसताना देखील स्थानिक भूमीपुत्रांनी मताधिक्य दिले होते. आता शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर कल्याण लोकसभेत शिंदेच्याविरोधात ठाकरेंना उमेदवार सापडेनासा झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक भूमिपुत्र संघटनांनामध्ये, वारकरी संप्रदाय, भूमीपुत्रांची आंदोलन यामध्ये सक्रिय असणारे काँग्रेसचे नेते संतोष केणे यांना उद्धव ठाकरे यांनी विचारणा केली आहे. Kalyan Lok Sabha Election