

ठाणे; अनुपमा गुंडे : राज्यात 'हर हर महादेव'वरून रणकंदन सुरू झाले असतानाच त्यात संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली आहे. इतिहासाचा विपर्यास करणार्या या चित्रपटाची मान्यताच रद्द करावी, अशी मागणी सेन्सॉर बोर्डाकडे करण्याचा निर्णय ब्रिगेडने घेतला आहे.
या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा व सरदारांचा चुकीचा इतिहास दाखवून त्यांची बदनामी करण्यात आली आहे. इतिहासाची मोडतोड करून विकृतीकरण करण्यात आले आहे, याची उदाहरणेच संभाजी ब्रिगेडचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुभाष सावंत यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना दिली. ती अशी…
चित्रपट दिग्दर्शकाने सेन्सॉर बोर्डाकडे काही पुरावे दिले असल्याचा दावा केला असला, तरी ज्या पुस्तकांचा आधार त्यांनी दिला आहे, त्यासाठी कोणते संदर्भग्रंथ वापरले आहेत, या सर्व कायदेशीर बाबींचा संभाजी ब्रिगेड अभ्यास करूनच सेन्सॉर बोर्डाकडे जाणार आहे.
– सुभाष सावंत,
नवी मुंबई जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड