

पाचगणी, पुढारी वृत्तसेवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमीन दुरुस्ती करण्यासाठी नाम फौंडेशन च्या मदतीने १०५ गावातील ८५ गावातील १८०० शेतकरी ९०० एकर शेतजमीन आणो २० किमी नदी व ओढे दुरुस्तीचे उत्तम काम झाले. या कामाचा लोकांपर्ण सोहळा नाम फौंडेशनचे प्रमुख विश्वस्त पदमश्री नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत बुधवारी तळदेव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक शेती करावी. राजकारणापासून सामान्य माणसांनी दूर राहावे. राजकीय लोकांकडून विकास करून घ्यावा, आणि समाजासाठी प्रत्येक माणसाने योगदान द्यावे. मला काय मिळते यापेक्षा मी काय देतो याचा विचार करावा, असे मत व्यक्त केले.
१०५ गाव ही सामाजिक संघटना याचे काम चांगले आहे. भविष्यात नाम आणि आपण एकच आहोत. सोबत राहून समाजोपयोगी ,काम करू यासाठी नाम कायम आपल्या बरोबर असेल याची ग्वाही दिली. पाटेकर यांनी शेतकऱ्यांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी तळदेव हायस्कूल मध्ये डिजिटल क्लास रूमचे उदघाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
हा सोहळा १०५ गाव समाजाच्या वतीने आयोजित केला होता. या सोहळ्याला कोयना सोळशी कांदाटी आणि बामणोली विभागातील शेतकरी बांधव शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील, इंद्रजित देशमुख, चंद्रशेखर एल एस, क्षिप्रा माथूर, आणि संजय नाईक हे नाम चे विश्वस्त प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
या सोहळा यशस्वी होण्यासाठी १०५ गाव समाजाचे अध्यक्ष घनश्याम सकपाळ, कार्याध्यक्ष डी के जाधव, उपाध्यक्ष सुभाष सोंडकर, सचिव गणेश उतेकर, संजय संकपाळ गुरुजी, बी व्ही शेलार, किसन जाधव, समिती प्रमुख वसंत शेठ शिंदे, जगन्नाथ मोरे, हरिभाऊ कदम, लक्ष्मण दादा जाधव, संजय जाधव, संदीप उतेकर, संजय उतेकर, शांताराम कदम, गोविंद शिंदे, सोमराज शिंदे, राजेश जाधव आणि समाजाचे प्रमुख पदाधिकारी तसेच समाजबांधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय संकपाळ आणि संजय जाधव यांनी केले. तर आभार श्री संदीप उतेकर यांनी मानले.