सातारा, पुढारी वृत्तसेवा : कायम वादाच्या भवऱ्यात अडकलेला आनेवाडी टोल नाका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये सहभागी होणारे वारकऱ्यांना आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी अडवण्यात आले. रिलायन्सच्या अधिकाऱ्यांने वारकऱ्यांच्या गाड्यांच्या टोल वसुलीसाठी अडवल्यामुळे गाडीतील सर्व वारकरी आंदोलनाच्या तयारीत होते व काही वेळ टोल नाका थांबून ठेवला थोड्याच वेळामध्ये भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गर्जे यांनी मध्यस्थी करून गाड्या सोडून दिल्या व वाहतूक करून दिली.