पांगारे येथील मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

पांगारे येथील मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
Published on
Updated on

सातारा, पुढारी वृत्तसेवा : बहिणीची छेड काढू नकोस, असे समजावून सांगणार्‍या पांगारे (ता. सातारा) येथील युवकाच्या घरावर मे महिन्यात रात्री राजापुरी गावच्या 30 हून अधिक युवकांनी हल्ला केला होता. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या राहुल शिवाजी पवार (वय 28) या युवकाचा शनिवारी मृत्यू झाला.

याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आकाश आत्माराम मोरे, सुयोग जयसिंग गुरव, यश दीपक निकम, गजानन आनंदराव मोरे, तुषार शंकर साळुंखे, गणेश तात्याबा मोरे, जगदीश शंकर साळुंखे, प्रथमेश भाऊसो साळुंखे, प्रतीक सतीश साळुंखे, गणेश युवराज मोरे, संकल्प संजय साळुंखे, आविष्कार संजय साळुंखे (सर्व रा. राजापुरी, ता. सातारा) यांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, पांगारे गावातील मुलगी ही राजापुरी शाळेतील इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. तिची राजापुरी गावातील गणेश युवराज मोरे वारंवार छेड काढत होता. यामुळे तिने भावाला याची कल्पना दिली. तेव्हा त्याने गणेश मोरे याला दोन वेळा समजावून सांगितले होते. मात्र, त्यावर गणेश मोरे आणि त्याच्या मित्रांनी पुन्हा धमक्या देणे सुरु केले. यावरूनच दि. 5 मे रोजी वाद झाला. त्या दिवशी मध्यरात्री 30 पेक्षा अधिक युवकांनी घरात घुसून लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने राहुल पवार व नयन पवार यांना मारहाण केली. या हल्ल्यात राहुल पवार गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर पुण्यात उपचार सुरु असताना त्याचा शनिवारी मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news