मिरजेत टोळी युद्धाचा भडका : ‘डीबी’ बरखास्त

नदाफ-काझी टोळीयुद्धाची वरिष्ठ पातळीवर दखल : पथकाची काढली खरडपट्टी
Miraj gang war
मिरजेत टोळी युद्ध
Published on
Updated on

मिरज : मिरजेत म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीमध्ये अनेक दिवसांपासून टोळीयुद्ध सुरू आहे. यातून मिरज शहरात दहशत निर्माण करून एका हॉटेलची देखील तोडफोड करण्यात आली. या प्रकाराची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली असून, मिरज शहर डीबीच्या पथकाची खरडपट्टी काढत ती बरखास्त करण्यात आली.

Miraj gang war
Thane News | अग्निशस्त्रांची अवैध वाहतूक करणारी टोळी गजाआड

म्हमद्या नदाफ याचा साथीदार समीर कुपवाडे याच्या हॉटेलची काझी टोळीने तोडफोड करून मोठे नुकसान केले होते. याप्रकरणी समीर कुपवाडे याने काझी गटातील 50 जणांविरुद्ध मारहाण, तोडफोड आणि दरोड्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी मतीन काझी, मोहिद्दिन काझी आणि बिलाल काझी या तिघांना अटक केली. या मारहाणीमध्ये समीर कुपवाडे याच्यासह सहाजण जखमी झाले होते.

याप्रकरणी बिलाल काझी यानेदेखील तक्रार दिली आहे. मागील भांडणाचा राग मनात धरून मारहाण केल्याचे तसेच मतीन काझी याच्यावर हत्याराने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये समीर कुपवाड याच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरजेत म्हमद्या नदाफ आणि काझी टोळीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हा प्रकार थोपविण्यात मिरज शहर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला अपयश आल्याचे दिसून येत होते. मिरजेतील घटनेची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आली.

Miraj gang war
रायगड : दिवसा नोकरी अन् रात्री चोरी करणारी टोळी गजाआड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news