पुतण्यापासून वाचवा म्हणण्याची वेळ शरद पवार यांच्यावर : खोत

सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Published on
Updated on

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  खा. शरद पवार यांच्या सरदारांनी शेतकर्‍यांची घरे लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला. हे पाप त्यांना फेडावे लागत आहे. आता, त्यांचे सरदार सैरभैर झाले आहेत. जैसी करणी वैसी भरणी. पुतण्यापासून मला वाचवा असे म्हणण्याची वेळ शरद पवार यांच्यावर आली आहे, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कुरळप (ता. वाळवा) येथे पत्रकारांशी बोलताना केली.

खोत म्हणाले,राज्याच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे राजकारण प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे निघाले आहे. 80 च्या दशकामध्ये शरद पवार यांचा राजकारणात उदय झाला. तेथूनच राजकारणाचा र्‍हास व्हायला सुरुवात झाली. वाडे विरुद्ध गावगाडे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित संघर्ष सुरू झाला.त्याचा अंमल 50 वर्षे राहिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news