सांगली : बोगस लग्ने लावणार्‍या टोळीचा सांगलीत पर्दाफाश | पुढारी

सांगली : बोगस लग्ने लावणार्‍या टोळीचा सांगलीत पर्दाफाश

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  एकाच महिलेचे तिघांशी लग्न लावून नवरदेवांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्‍या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. पीडित महिला इचलकरंजीतील असून, तिची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कराड व खानापूर तालुक्यांतील दोघांना अटक केली आहे.

वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर) व शंकर बाबुराव थोरात (वसंतगड, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. पीडित महिला इचलकरंजीत जवाहरनगर येथे राहते. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगलीत बोलावून घेतले. ‘नोकरी करून तुला किती पैसे मिळणार, त्यापेक्षा तुझे दुसरे लग्न लावून देतो,’ असे सांगितले.

Back to top button