सांगली : विसापुरात जागेच्या वादातून एकाचा खून | पुढारी

सांगली : विसापुरात जागेच्या वादातून एकाचा खून

तासगाव; पुढारी वृत्तसेवा :  विसापूर (ता. तासगाव) जमिनीच्या आणि जागेच्या वादातून काठीने बेदम मारहाण करून एकाचा खून केल्याची घटना घडली. संदीप प्रकाश माळी (वय 31) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी : मृत संदीप आणि त्यांचे मामा व त्याच्या मुलांमध्ये जमीन आणि जागेचा वाद सुरू आहे. त्यातून मंगळवारी वाद उफाळून आला. मृत संदीप याला तीन ते चारजणांनी काठीने बेदम मारहाण केली. यात काठीचा घाव वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना गावातील खासगी रुग्णालयात दाखल केले, पण तेथील डॉक्टरांनी त्यांना तासगाव येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. उपचारसाठी नेत असताना वाटेत त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यत संशयितांची नावे समोर आली नव्हती.

Back to top button