सांगली : आईच्या मृत्यूनंतर 2 तासांतच मुलानेही सोडले प्राण | पुढारी

सांगली : आईच्या मृत्यूनंतर 2 तासांतच मुलानेही सोडले प्राण

आष्टा;पुढारी वृत्तसेवा :  वाळवा तालुक्यातील कारंदवाडी – कृष्णानगर (हाळ) येथे सोमवारी (दि.16) संक्रांतीदिवशी आईच्या मृत्यूनंतर दोन तासातच मुलाचाही मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने गावावर एकच शोककळा पसरली. शहाबाई विलास पाटील (वय 62), शहाजी विलास पाटील (43) अशी दुर्दैवी माय लेकरांची नावे आहेत.

शहाजी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गेल्या एक महिन्यापासून त्यांच्यावर कोल्हापूर व मुंबई येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे शहाबाई प्रचंड मानसिक दडपणाखाली होत्या. उपचार सुरू असतानाच सोमवारी दुपारी त्यांचे निधन झाले. रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आईच्या मृत्युनंतर दोन तासातच शहाजी यांचे मुंबई येथील हॉस्पटलमध्ये निधन झाले.

Back to top button