साखर उद्योग हा अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महाराष्ट्रासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणारा आहे. यातून ऊस शेती, साखर कारखाने यांना बळकटी मिळणार आहे. राज्यातील 278 पैकी बहुसंख्य सहकारी, खासगी साखर कारखान्यांतून 'ग्रीन एनर्जी' निर्मितीवर भर दिला जात आहे. एकट्या सांगली जिल्ह्यातील सात कारखान्यांमध्ये थेट उसाच्या रसापासून इथेनॉलचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात सर्वच कारखान्यांची इथेनॉलचे उत्पादन क्षमता ही तब्बल सव्वादोनशे कोटी लिटरच्या घरात आहे. चालू वर्षासाठी राज्यभरात कारखान्यांना पावणेचारशे कोटी लिटर्स इथेनॉल उत्पादनाचे लक्ष्य आहे.