मिरज: विवाहानंतर नववधू चार दिवसात बेपत्ता | पुढारी

मिरज: विवाहानंतर नववधू चार दिवसात बेपत्ता

मिरज पुढारी वृत्तसेवा :  मिरज तालुक्यातील एका गावातून एक नववधू शनिवारी (दि. 19 मार्च) मध्यरात्री बेपत्ता झाली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

या तरुणीचा औरंगाबाद आणि मिरज तालुक्यातील बुधगाव व सांगलीवाडी येथील एजंटांच्या मध्यस्थीने या गावातील तरुणासोबत आठवडाभरापूर्वी विवाह झाला होता. परंतु शनिवारी मध्यरात्री ती अचानक बेपत्ता झाली आहे. तिचा शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही.

ती बेपत्ता झाल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तसेच ती बेपत्ता झाल्यानंतर घरातील काही मौल्यवान वस्तूदेखील गायब झाल्या असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button