राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन | पुढारी

राजारामबापू कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे अपघाती निधन

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक व उद्योजक आनंदराव दत्तू पाटील (वय ५७) यांचे सोमवारी येथे अपघाती निधन झाले.

त्यांच्या येथील वाघवाडी रस्त्यावरील निवास्थानासमोरच चारचाकी गाडीने त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात बारा वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी अवस्थेत त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.

आनंदराव पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच रेठरे धरण येथील ग्रामस्थांनी तसेच राजारामबापू उद्योग समूहातील पदाधीका-यांनी रुग्णालय परीसरात धाव घेतली. त्यामुळे येथे मोठी गर्दी झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा , भाऊ असा परीवार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे ते नातेवाईक होत.

Back to top button