सांगली : आटपाडीत विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू

सांगली : आटपाडीत विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू
Published on
Updated on

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : येथील तलावात पाणी पातळी कमी झाल्याने पाण्यातील विद्युत मोटर पाण्यात ठेवण्यासाठी गेलेल्या दोन शेतकर्‍यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अनिकेत अमृत विभुते (वय 24, रा. माडगुळे, ता. आटपाडी), विलास मारुती गुळदगड (वय 45, रा. शेवते ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. दुपारी ही घटना घडली.

आटपाडी तलावातून शेतीसाठी अनेक शेतकर्‍यांनी शेतीसाठी पाईपलाईन करून पाण्याची सोय केली आहे. माडगुळे येथील सोमनाथ व मधुकर विभुते यांच्यासह चार पाच जणांची सामुदायिक पाईपलाईन आहे. तलावातील पाणी साठा कमी झाल्याने विद्युत मोटर पुन्हा पाण्यात बसवावी लागते. मोटर बसविण्यासाठी अनिकेत याने विलास गुळदगड आणि सखाराम पाटील यांना घेऊन तलावावर गेला. सखाराम हे बांधावर थांबले. अनिकेत विभुते व विलास हे मोटर पाण्यात बसविण्यासाठी गेले. यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news