Raj Thackeray: खासदार फोडा, आमदार फोडा... 6 खासदारांच्या फुटीनंतर राज ठाकरेंचा संताप; ऑपरेशन टायगरबद्दल काय म्हणाले?

Raj Thackeray Reacts to Split in UBT Sena MPs: ठाकरे गटातील सहा खासदार फुटल्याच्या चर्चांदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर जोरदार टीका केली.
Raj Thackeray
Raj ThackerayPudhari
Published on
Updated on

Raj Thackeray Reacts to Split in UBT Sena MPs: शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील सहा खासदार वेगळा मार्ग स्वीकारणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. या घडामोडींवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही स्पष्ट भूमिका मांडत सध्याच्या राजकीय वातावरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य फुटीबाबत विचारले असता राज ठाकरे यांनी केवळ एका पक्षापुरती प्रतिक्रिया न देता राज्यातील एकूणच राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सध्या महाराष्ट्रासमोर पावसाचे संकट, दुष्काळाची शक्यता आणि विविध विकासविषयक आव्हाने उभी असताना राजकीय पक्ष मात्र एकमेकांचे खासदार, आमदार आणि नगरसेवक फोडण्यात गुंतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील जनतेने मतदानासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहून ज्यांना निवडून दिले, तेच लोक नंतर सत्ता आणि पैशांसाठी पक्ष बदलताना दिसतात. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेकडे केवळ राजकीय घटना म्हणून न पाहता जनतेनेही गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Raj Thackeray
Ram Mandir: राम मंदिर वादाचा परिणाम; देणगीत 80 टक्के घट, चोरीमुळे भक्तांचा संताप,15 दिवसांत किती कोटी जमा झाले?

राजकीय पक्षांमधील फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोकशाहीच्या मूल्यांवर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सूचित केले. निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या कौलाचा आदर राखला गेला पाहिजे, असे सांगताना त्यांनी मतदारांनाच थेट प्रश्न विचारला. पक्षांतर करणारे नेते पुन्हा मतांसाठी जनतेसमोर आले, तर त्यांना पुन्हा निवडून द्यायचे की नाही, याचा विचार नागरिकांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांनी पुढे राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. सततच्या पक्षांतरांमुळे आणि सत्तेच्या गणितांमुळे पुढच्या पिढीसमोर कोणता आदर्श ठेवला जात आहे, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. विकास, रोजगार, शेती आणि पाणी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याऐवजी राजकारण फक्त संख्याबळ आणि सत्तासमीकरणांभोवती फिरताना दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले असून आगामी काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेली टिप्पणी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news