रायगड : ग्रामीण भाग बनतोय गांजाचे केंद्र; नेवाळीत ९० किलो गांजा पकडला

रायगड : ग्रामीण भाग बनतोय गांजाचे केंद्र; नेवाळीत ९० किलो गांजा पकडला
Published on
Updated on

नेवाळी; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील धामटान परिसरात ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेला ९० किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रवी मुन्नालाल जैस्वाल, हसिन कयूम खान, मोहम्मद शादाफ रियाज सिद्धीकी अशी आरोपींची नावं आहेत.

ग्रामीण भागातील नशेखोरांची तलप भागवण्यासाठी गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते. या विक्रीला आळा घालण्यात स्थानिक पोलीस यंत्रणांना अपयश आले आहे. त्यामुळे आता अंबरनाथ तालुक्यात अमली पदार्थ विरोधी पथकाने प्रवेश केला आहे. डोंबिवली पाईपलाईन अंबरनाथ महामार्गावरील धामटाण बस स्टॉप जवळ तिघे जण गांजा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गुपित माहिती ठाणे अमली पदार्थ पथकाला मिळाली होती. या नंतर सापळा रचून ९० किलो गांजासह तिघांना बेड्याठोकल्या आहेत. सध्या तिघांना उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून गांजा ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक दीपेश केणी करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news