

नेरळ : कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ-कळंब मार्गावर धामोते गावाजवळ असलेल्या या पंचतारांकित एका रिसॉर्ट मधील सांडपाणी हे थेट उल्हास नदीपात्रावरील असलेल्या पाणीपुरवठा ठिकाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील धामोते गावाजवळील व नेरळ - कळंब राज्य मार्गालगत असलेल्या उल्हास नदीच्या तीरावर कोल्हारे ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत हद्दीतील असलेल्या गावांना पाणीपुरवठा करणारे पंप हाऊस कार्यरत आहे. मात्र नेरळ - कळंब राज्यमार्गा लगत असलेलेल्या पंचतारांकित डिस्कव्हर रिसॉर्टतमधील सांडपाणी हे याच उल्हास नदी पात्रात सोडले जात असल्याने व ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा करणारा पंप हाऊस हा देखील जवळपास आहे. ते साडपाणी हे थेट जमिनीत झिरपून
उल्हास नदीवर कार्यरत पाणी पुरवठा पंपाजवळ जाते. पुन्हा त्याच पंपाद्वारे हे दूषित सांडपाण्याचा पुरवठा हा पंपाव्दारे नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून होत असल्याचा आरोप हा धामोते येथील ग्रामस्थांकडून होत आहे. या दूषित पाणीपुरवठयामुळे धामोते आणि परिसरातील नागरिकांना परिणामी साथीच्या आजार पसरण्याची भीती असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून भीती व्यक्त केली जात आहे.
उल्हास नदीत पात्रात सोडले जाणारे सांडपाणी तात्काळ बंद करण्यात यावे, तसेच संपूर्ण चौकशी करून संबंधित रिसॉर्ट व्यवस्थापनावर कडक कारवाई करावी, अशा विविध मागण्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जिल्हाधिकारी रायगड, प्रांत अधिकारी, तहसिलदार, पंचायत समिती यांच्यासह संबंधित विभागांकडे तक्रार करण्यात आली आहे.
त्वरित उपाययोजना न झाल्यास व संबंधित सांडपाणी सोडणाऱ्या रिसॉर्ट प्रशासना विरोधात योग्य ती कार्यवाही झाली नाही. तर आगामी काळात तीव्र आंदोलन आणि उपोषणाचा इशारा धामोते येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.