Raigad paddy farming : भातशेती बहरली तरी प्रस्तावित प्रकल्पांमुळे शेतकरी चिंताग्रस्त

'तिसरी मुंबई' प्रकल्पासाठी हजारो एकर शेतजमिनीचे होणार संपादन
Raigad paddy farming
Raigad paddy farmingpudhari photo
Published on
Updated on

उरण : राजकुमार भगत

रायगड जिल्ह्यात भात शेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. भात शेतीला पोषक वातावरण आणि पाऊस पडत असल्याने भात शेती बहरली आहे. मात्र उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील हजारो हेक्टर भात शेतीवर तिसऱ्या मुंबईच्या उभारणीसाठी राज्य सरकार बुलडोझर फिरवण्याचा घाट घातलत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

उरण, पनवेल आणि पेण तालुक्यातील १२४ गावांमधील सुपीक जमीन राज्य सरकार एमएमआरडीएच्या 'तिसरी मुंबई' (कर्नाळा-साई-चिरनेर नवनगर) प्रकल्पाच्या उभारणीसाठी संपादित करण्याचा प्रयत्न करत आहे.त्यामुळे या तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवून आपल्या शेत जमीनीवर भात शेतीची लागवड केली आहे.

Raigad paddy farming
Konkan green energy hub : कोकण किनारपट्टी बनणार महाराष्‍ट्राचे 'ग्रीन एनर्जी हब'

एकंदरीत सुपीक जमिनीचे नुकसान : उरण, पनवेल आणि पेणमधील हजारो एकर बागायती व शेतजमीन उद्ध्वस्त होऊन स्थानिक संस्कृती संपुष्टात येऊन येथील आगरी, कोळी व कराडी समाजाचे अस्तित्व संपुष्टात येऊन, उपजीविकेचे साधन नष्ट होणार असल्याने आज जरी भात शेती जोमाने बहरत असली तरी राज्य सरकार लादत असलेल्या तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे.

Raigad paddy farming
Pratap Sarnaik : महिनाभरात मराठी शिकली नाही तर तीन महिने ‘बॅज’ बंद!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news