भवानी पेठ; पुढारी वृत्तसेवा: सोमवार पेठेतील शाहू उद्यानासमोरील पदपथालगत कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, त्वरित उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. परिसरातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.
या रस्त्यालगत राडारोडा वाहतुकीस अडथळा ठरत आहे. तर उद्यानात फिरायला येत असलेल्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर भाजी मंडई असल्याने सकाळी व सायंकाळी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ असते. त्यांनाही या कचर्याचा त्रास होत असून, ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.