पुणे : योजनेत भाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही

पुणे : योजनेत भाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै आहे. मात्र, या योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीत पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी दिले.

शासनाच्या ई-पीक पाहणीत पीक पेर्‍यांची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकर्‍यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदविलेले पीक, यामध्ये काही तफावत आढळल्यास त्या शेतकर्‍याने पीक पाहणीत केलेली नोंद अंतिम गृहीत धरण्यात येईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे.

ऑगस्टनंतर ई-पीक पाहणीत नोंदीचे आवाहन
या योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीत पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नाही. शेतकरी पीक विम्याबाबत स्वयंघोषणापत्राद्वारे या योजनेत सहभाग घेऊ शकतात. मात्र, 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news