पुणे : पाऊस लांबल्याने उसाच्या लागणीवर परिणाम

पुणे : पाऊस लांबल्याने उसाच्या लागणीवर परिणाम
Published on
Updated on

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : पावसाने ओढ दिल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाच्या लागणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्री छत्रपती कारखान्याने 1 जुलैपासून कारखान्याचा ऊस लागण हंगाम जाहीर केला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जून महिना संपत आला, तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कित्येक शेतकर्‍यांनी उसाची लागणी करण्यासाठी सर्‍या काढलेल्या नाहीत. काही शेतकर्‍यांनी सर्‍या काढून ठेवलेल्या असल्या, तरी चांगला पाऊस झाल्याशिवाय लागणी करणे शक्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सध्या असलेली उसाची पिके जगविण्याचे शेतकर्‍यांपुढे आव्हान आहे. सध्या निरा डावा कालव्याला आवर्तन सुरू असल्यामुळे शेतीच्या पाण्याची परिस्थिती टिकून आहे. नवीन उसाची लागणी करण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे, असे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. कारखान्याचा ऊस लागण हंगाम सुरू होण्यासाठी चार-पाच दिवस उरले असताना पावसाने ओढ दिल्यामुळे या ऊस लागण हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उसाबरोबरच फळझाडांची लागवड करणारे शेतकरी देखील फळझाडांची लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news