पालिकेतील पाण्याची नासाडी थांबवा; सजग नागरिक मंचाची मागणी

पालिकेतील पाण्याची नासाडी थांबवा; सजग नागरिक मंचाची मागणी
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'शहराच्या इतर भागात पाणीकपात सुरू असतानाच महापालिकेच्या मुख्य इमारतीतील स्वच्छतागृहांमध्ये दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाण्याची ही नासाडी तातडीने थांबवून पाणीबचत करावी,' अशी मागणी सजग नागरिक मंचाने आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. पावसाने ओढ दिल्याबरोबर शहरात पाणीकपात केली जात आहे. पुणेकर निमूटपणे ही पाणीकपात सहनही करत आहेत. हजारो रुपये खर्च करून टँकरही मागवीत आहेत.

एकीकडे महापालिका पुणेकरांना पाणीबचतीचे सल्ले देत आहे, तर दुसरीकडे महापालिकेची स्वतःची अवस्था दिव्याखाली अंधार अशी असल्याचे दिसते. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व स्वच्छतागृहांची पाहणी केली. त्यामध्ये पुरुषांच्या स्वच्छतागृहांमधील 80 टक्के युरीनल्समध्ये अव्याहत पाणी वाहताना आढळले. त्यामुळे पाण्याची नासाडी तातडीने थांबवून पाणीबचत करावी, असे मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news