![पाण्यासाठी गाठावे लागतेय स्मशान; कात्रज-कोंढवा रस्त्यावरील चित्र](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F04%2FsmA.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पिसोळीला पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा सुरू आहे. पिसोळी, उंड्री, वडाचीवाडी या भागांत जवळपास 110 टँकर पाणी दिले जात आहे. नागरिकांकडून पाण्याची मागणी वाढत असून, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.– काशिनाथ गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभागगावे महापालिकेत समाविष्ट करताना प्रशासनाने वाढत्या लोकसंख्येचा विचार केलेला दिसत नाही. पाण्यासह इतर सोयीसुविधांचा आराखडा तयार केला नाही. यामुळे या गावातील नागरिकांना सध्या पाणीटंचाईचे चटके बसत आहेत.– दशरथ काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्यआगीतून उठलो आणि फुफाट्यात पडलो. पाण्यासाठी मुंढवा सोडला आणि उंड्रीला आलो. चांगले दिवस येतील, असे वाटले होते. पण, स्मशानभूमीतून पाणी भरावे लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. टँकर परवडत नसल्याने घशाची तहान भागविण्यासाठी हे करावे लागत आहे.– नारायण शिंदे, रहिवासी
हेही वाचा