पवनानगर : पावसामुळे शेतीचे नुकसान

पवनानगर : पावसामुळे शेतीचे नुकसान
Published on
Updated on

पवनानगर : पुढारी वृत्तसेवा : पवन मावळ परिसरात गेल्या कांही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासात पवन मावळ परिसरात सुमारे 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे शेतीचे बांध फुटले असून, भाताची रोपे वाहून गेली आहेत.

तर भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणत असल्यामुळे अनेक ठिकाणचे भातपीक खराब होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून वर्तवली जात आहे.
बुधवार (दि.13) दिवसभर पाऊस व जोराचे वारे असल्यामुळे पवनमावळ परिसरात अनेक ठिकणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. ़काही ठिकाणी विजेच्या खांबांवर झाडे पडल्यामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडीत झाला होता.

त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. पावसाचा जोर कायम असून पवनेच्या पाणीसाठ्यात जलदगतीने वाढ होत आहे.
तर आपटी- गेव्हेंड येथे रस्त्यावर दरड कोसळ्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तर हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news