खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती
Published on
Updated on

वेल्हे : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी खडकवासला धरणसाखळीत विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी खडकवासला धरणातून सुरू असलेला मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला. शुक्रवार सकाळपासून पानशेत, वरसगाव, खोर्‍यासह सिंहगड भागात पावसाची उघडीप होती. डोंगरी पट्ट्यात ढगाळ वातावरण व ऊन पडले होते. चारही धरण माथ्यावर दिवसभरात एक मिलिमीटरही पावसाची नोंद झाली नाही.

पानशेत, वरसगाव धरणातील तसेच धरणक्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासलातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सध्या खडकवासलातून मुठा कालव्यात 1005 क्युसेक तसेच पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. सकाळपासून टप्प्याटप्प्याने खडकवासलाच्या विसर्गात कपात करण्यात आली. एक महिना उशिरा पाऊस सुरू होऊनही 1 जुलैपासून काही अपवाद वगळता धरणसाखळीत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दीड महिन्यात खडकवासलातून तब्बल 21 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news