काठापूर परिसरात अतिवृष्टी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल

काठापूर परिसरात अतिवृष्टी पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल
Published on
Updated on

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील काठापूर, पिंपरखेडच्या दाभाडेमळा या भागात मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात शेतातून ओढे-नाल्यांचे पाणी वाहिले. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. मागील आठवड्यात पिंपरखेड येथे झालेल्या ढगफुटीनंतर रविवारी दुपारी तीननंतर पिंपरखेड काठापूरला दीड तास पावसाने जोरदार वार्‍यासह झोडपून काढले. दाभाडेमळा, काठापूर येथे पडलेल्या पावसाने शेतकर्‍यांच्या शेतातून ओढे-नाल्यांसारखे पाणी वाहत होते.

यामुळे शेताचे बांध फुटून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकर्‍यांच्या शेतातील कांदाचाळींना पाण्याने वेढा दिल्याने कांदा भिजल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.पावसाने ओढ्यांना पूर आला. अगोदरच ढगफुटीने शेतकरी मोठ्या संकटात असताना रविवारी झालेल्या पावसाने शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news