आळंदी : येथील इंद्रायणी नदीतील गरुडस्तंभाजवळील नदीपात्रातील जलपर्णीलगत एका अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. हा मृतदेह अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनी बाहेर काढला. काही दिवसांपासून इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, पाणीप्रवाह मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन येथील जलपर्णीलगत थांबल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या महिलेचे अंदाजे वय 30 ते 40 दरम्यान आहे. महिलेची ओळख पटलेली नाही. तपास आळंदी पोलिस करीत आहेत.