ते म्हणाले, विरोधक म्हणतात यांचे आता वय झाले, यांच्यावर आता काय अवलंबून राहायचं, पण माझे तुम्हाला सांगण आहे की माझे वय काढू नका. लोकांचे काम असेल, लोकांच्या हिताची जपणूक करणे हेच माझे काम आहे. मला बारामतीकरांनी काय दिलेले नाही असा सवाल करून पवार म्हणाले. याच लोकांनी मला सगळे दिले. आमदार मंत्री, चारदा मुख्यमंत्री केले. संरक्षण, शेती मंत्री, विधानसभा लोकसभा राज्यसभा सतत एक दिवसाची सुट्टी नाही. मी ५६ वर्षे कार्यरत राहिलो. शेतात काम करणार्या बैलांना सुद्धा शेतकरी सुट्टी देतात मला ५६ वर्षात एकदाही सुट्टी दिली नाही, हे वागणं बरं आहे का असा मिश्किल सवाल त्यांनी केला.