पुणे : मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Update)
गेले काही दिवस विश्रांती घेणारे मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागाला 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (Weather Update)
ऑरेंज अलर्ट : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9). यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9).