बारामती; पुढारी वृत्तसेवा : केंद्र आणि राज्यातील सरकार आज आमच्या हातात नाही. मात्र, तुम्ही लोकसभा निवडणुकीला काम केले तसे विधानसभेच्या निवडणुकीला केले, तर राज्य सरकार हातात कसे येत नाही हे मी पाहतोच, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. बारामती तालुक्यातील मतदारांनी राजकीय नेत्यांची दुकानदारी बंद पाडल्याचा टोलाही त्यांनी अजित पवार यांचा नामोल्लेख न करता लगावला. पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या आभार दौर्याप्रसंगी ते सांगवी येथे बुधवारी बोलत होते.