राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय

राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात थंडी वाढत आहे. मात्र, थंडीचा हा कडाका हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात सोमवारी (दि. 7) नाशिक शहराचे किमान तापमान 12. 6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोकणच्या काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला, तर पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

राज्यात नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून ढगाळ वातावरण, तर अधूनमधून किमान तापमानात घट होत आहे. सलग थंडी अजूनही पडलेली नाही. मात्र, हळूहळू रोज किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण भारतात ईशान्य मान्सून अ‍ॅक्टिव झाल्यामुळे बंगालच्या उपसागरापासून ते अगदी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, दक्षिण तमिळनाडू या भागापर्यंत जोरदार वारे, तसेच कमी दाबाचा पट्टा यामुळे दक्षिणेकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे येत आहे.

त्यामुळेच राज्यात अजूनही पाहिजे तशी थंडी पडत नाही. याचबरोबर पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून राज्याकडे थंड वारे वाहत नाहीत. कोरडे हवामान यामुळेदेखील राज्यातील थंडी कमी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news