उंडवडी : भटक्या कुत्र्यांच्या उच्छाद पाळीव जनावरे, नागरिकांवर हल्ले

उंडवडी : भटक्या कुत्र्यांच्या उच्छाद पाळीव जनावरे, नागरिकांवर हल्ले

उंडवडी (ता.बारामती); पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळ येथे भटक्या कुर्त्यांनी उच्छाद मांडला. वारंवार माकडांवर हल्ले करत असून, यात आतापर्यंत दोन माकडे मृत्युमुखी पडली. काही जखमी झाली आहेत. जवळपास दहा ते पंधरा भटकी कुत्री एकत्र फिरत असल्याने वन्य प्राण्यांसाठी तसेच इतर जनावरांही धोका निर्माण झाला आहे.

गावात शिरसाईदेवीचे मोठे मंदिर असल्याने भाविकांची तसेच नागरिकांची मोठी वर्दळ असते. याच परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वावर असल्याने नागरिकांवरही कुत्रे हल्ला करण्याची भीती आहे. दुसरीकडे माकडांवर सतत हल्ले होत असल्याने संबंधित विभागाकडून भटक्या कुत्र्यांच्या वेळेत बंदोबस्त करावा, अशी मागणी गावक-यांनी केली आहे.

या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत. माकडांवर कुत्रे हल्ले करीत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करावा.

                                                – साहिल काझी, प्राणिप्रेमी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news